मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
कोणत्याही वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो. त्यानंतर तर दरदिवशी ५० रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जातो. वाहनानुसार हा दंड असतो.
प्रवासी वाहनातून नागरिक प्रवास करीत असल्याने जीविताला धोका सर्वाधिक संभवतो. यासाठीच प्रमाणपत्राची सक्ती आहे. रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे.
अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाच महिन्यांत सात हजार ४१४ वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये फक्त ७ वाहने नापास झाली आहेत.
नवीन मालवाहू वाहनांना दोन वर्षांनंतर एकदा पुन्हा ८ वर्षांनंतर प्रत्येक वर्षाला फिटनेसची तपासणी करावी लागते. शोरुममधून नवीन खासगी वाहन घेतल्यास त्याला १५ वर्षांपर्यंत फिटनेस तपासणीची आवश्यकता नसते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार
आषाढी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन भाविकांना देवाचे २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद करण्यात असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल उभा राहणारा असल्याने, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोडः तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.
पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठल माउलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात.
येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचे मुखदर्शन किंवा पदस्पर्श दर्शन मिळावे हीच इच्छा असते. गर्दी असल्याने अठरा ते पंचवीस तास भाविकांना दर्शन रांगेत थांबावे लागते. यामुळे देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळावे, यासाठी काही पूजा बंद करून दर्शन वेळ वाढवण्याचा प्रयत्न मंदिर समितीकडून करण्यात येतो.
श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, अॅड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
२४ तास मुखदर्शन
देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. विठ्ठलाचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून (दि. २७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठलाचा पलंग काढला
भाविकांची मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभव जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे भाविकांना वेळ मिळणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीची तयारी झाली आहे.
श्रींचा काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी
राजोपचार बंद करण्यात येतात. तर नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता है राजोपचार सुरू राहतील. १६ जुलै (प्रक्षाळपूजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. जुलै पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज