मंगळवेढा टाईम्स टीम। मुलॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईकरांनी गर्दी सुरू केल्याने मुंबईत पुन्हा एकदा कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याचाच अर्थ मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली असून मुंबईकरांना आता कुठेही गर्दी करता येणार नाही.१५ जुलैपर्यंत हा जमावबंदी आदेश लागू असणार आहे. Curfew imposed again in Mumbai
फक्त काही अटी आणि शर्तीवर धार्मिक स्थळांना या जमावबंदीतून सूट देण्यात आली आहे. पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी हे बंदी आदेश काढले आहेत.
मुंबईत आजपासून १५ जुलैपर्यंत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही जमावबंदी असेल. या जमावबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा , सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना,नागरिकांना यामधून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज