mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बदला घेतला! भारत दिमाखात फायनलमध्ये; भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं; केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 4, 2025
in राष्ट्रीय
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना 4 विकेटसने धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या विजयात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली आहे.

कारण कोहलीने 84 धावांची अर्धशतकीय आणि अय्यरने 45 धावांची खेळी केली. या विजयानंतर टीम इंडिया फायनलमध्ये तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. कारण शुभमन गील अवघ्या 8 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या बेनच्या बॉलवर आऊट झाला होता. गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला होता.

विराट आणि रोहित मैदानात टिचून फलंदाची करतील अशी अपेक्षा होती. मात्र रोहित शर्मा कूपर कॉनोलीच्या बॉलवर 28 धावांवर बाद झाला.त्यानंतरल श्रेयर अय्यर मैदानात आला होता. यावेळी दोघांनी टीम इंडियाचा डाव चांगला साभाळला.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने 14 वर्षाचा वनवास संपवला. आयसीसीच्या स्पर्धेत नॉकऑउट फेरीत गेल्या 14 वर्षापासून भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला नव्हता.

काल भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास घडवला. भारताने याआधी 2011च्या वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा अहमदाबाद येथे पराभव केला होता.

भारताने 2011च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटनी पराभव केला होता. त्यानंतर आयसीसीच्या स्पर्धेत बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा नकोसा असलेला रेकॉर्ड आज भारताने बदलून टाकले.

या विजयाबरोबर भारत हा असा पहिला संघ ठरला आहे जो तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलमध्ये पोहोचला आहे. इतक नाही तर टीम इंडियाची आयसीसी स्पर्धेची ही सलग तिसरी फायनल आहे.

याआधी भारत २०२३च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. आणि आता भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३ मध्ये इंग्लंड त्यानंतर २०१७ मध्ये भारताचा फायनलचा सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला होता.

आता भारतीय संघाने सेमीफायनलच्या साामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान भारताचा फायनलचा सामना केव्हा, कुठे आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

फायनल केव्हा, कुठे अन् कधी होणार?

भारताचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह भारताने दणक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे . या सामन्यात विजय मिळवणारा संघ ९ मार्चला भारतीय संघाविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे.

केव्हा होणार फायनलचा सामना ?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार आहे.

कुठे होणार सामना?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. जर भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला नसता, तर हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला गेला असता. मात्र आता भारताने फायनलमध्ये प्रवेश केल्याने हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे.

या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरुवात होईल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बदला घेतला

संबंधित बातम्या

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

May 9, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

भारताचा पाकिस्तानला दणका! पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली; पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली

May 8, 2025
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी 36 तासात काय काय केलं? लष्कराला पूर्ण सूट

May 8, 2025
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

भारताची रणनीती आणि देशवासियांच्या भावनांचा हुंकार; ऑपरेशन सिंदूर नावाची गोष्ट नेमकी काय?

May 8, 2025
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

May 7, 2025
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मोठी बातमी! राज्यात ‘या’ 16 ठिकाणी आज युद्ध सराव; हल्ल्यापासून बचावासाठी केंद्र सरकारचे निर्देश

May 6, 2025
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

चुन-चुन कर मारेंगे! कोणालाही सोडणार नाही, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार आक्रमक; म्हणाले दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार

May 2, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

नागरिकांनो! बँक ते गॅस सिलिंडर…आजपासून बदलणार ५ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

May 1, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

देशात जातनिहाय जनगणना होणार; मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

May 1, 2025
Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच…

मोठी बातमी! धनुभाऊ अखेर मंत्रिमंडळातून गेट आऊट; राज्यपालांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

अवैधरित्या वाळू चोरी व मंगळवेढा तहसील कार्यालयातून टिपर पळवून शासकीय कामात अडथळा प्रकरणातून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

May 9, 2025
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मतदारसंघातील प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन उभे करणार; शेतकरी, घरगुती ग्राहक, औद्योगिक धंद्याला बसला मोठा फटका; अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिले निवेदन; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

May 9, 2025
दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला ‘या’ भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला ‘या’ भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

May 9, 2025
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

May 9, 2025
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

शेतकरी बांधवांनो! अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक; उद्या पिक विमा संदर्भातील लेखी तक्रारी घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन

May 9, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

भारताचा पाकिस्तानला दणका! पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली; पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली

May 8, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा