मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पती-पत्नीमधील सततचा वाद हा सुखी संसाराला सुरूंग लावणारा ठरतो. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील राजेश्वर नगर येथील जन्मदात्या आईने दोन मुलांचा तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला.
त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडली असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली.
ज्योती सुहास चव्हाण (वय २७) असे महिलेचे नाव आहे. तर अथर्व सुहास चव्हाण (वय ३.५ वर्ष) व आर्या सुहास चव्हाण (वय २ वर्ष) अशी मुलांची नावे आहेत.
पोतदार शाळेसमोर चव्हाण यांचे घर आहे. सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात लिपीक या पदावर काम करतात. त्यांच्यात आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणातून नेहमी वाद होत होते.
त्यातूनच हा घेऊन जीवन संपवले. प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. शाळेला सुट्टी असल्याने अथर्व आणि आर्या हे दोघेही घरीच होते.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दोघेही टीव्ही पाहण्यात दंग होते. त्यावेळी ज्योती यांनी टीव्हीचा आवाज आणखी वाढविला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून दाब दिला.
यामुळे श्वासोश्वास बंद होऊन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्योती हिने बेडरूममध्ये सायंकाळी पाचनंतर पोलिसांना याबाबतची खबर मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्योती हिच्यासह अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. यातूनच ज्योती यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सुहास यांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील यांनी दिली.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी सुहास चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज