टीम मंगळवेढा टाईम्स।
ऊसतोडीसाठी घेतलेली उचल परत न दिल्याने मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथून एकास उचलून नेले. या प्रकरणी तिघांवर मंगळवेढा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बठाणमध्ये कोपीजवळ नवनाथ सावंत बसलेले असताना तेथे अण्णा बुरले (बुरलेवाडी,ता.सांगोला), महादेव मासाळ, भाऊ लवटे (दोघे रा.तनाळी,ता.पंढरपूर) हे तिघे आले.
त्यांनी नवनाथ यांना ऊस तोडणीसाठी पैसे घेतले आणि ऊस तोडणीसाठी दुसऱ्या टोळीत गेला. आमचे उचल म्हणून घेतलेले पैसे दे म्हणत दमदाटी करत गाडीत बसवले.
आणि ते निघून नेले. अशी फिर्याद नवनाथ यांची पत्नी विद्या सावंत (मूळ गाव तनाळी,ता.पंढरपूर, सध्या बठाण,ता.मंगळवेढा) यांनी दिली आहे.
ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बठाण गावालगत घडली आहे. रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पैशासाठी पतीचे अपहरण केल्याची फिर्याद पत्नीने दिल्याने अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश कोळी तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज