टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य सहकारी बँकेकडून आज दि.१४ डिसेंबर रोजी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर होणारी जप्तीची कारवाई स्थगित करण्यासाठी
संचालक मंडळाने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना साकडे घातले आहे. त्यांच्या प्रयत्नास यश येणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्जापोटी आज १४ डिसेंबरला राज्य सहकारी बँकेचे अधिकारी कारखान्याचा ताबा घेण्यासाठी येणार आहेत.
तशा प्रकारची नोटीस आल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मुंबईत सहकारमंत्री यांची भेट घेऊन ही कारवाई टाळण्याची विनंती केली होती.
त्यानुसार फोनवरून सहकारमंत्री पाटील यांनी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांच्याशी चर्चा केली होती.
त्यानंतर शनिवारी पुन्हा भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याण काळे, विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार आदींनी सहकारमंत्री पाटील यांची भेट घेऊन कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली.
येत्या १५ दिवसांत अन्य मार्गाने पैसे उपलब्ध होणार आहेत. त्यापूर्वी जप्तीची कारवाई झाल्यास पुढचे मार्ग बंद होतील आणि संस्था अडचणीत येईल.
त्यामुळे आणखी तीन महिने मुदतवाढ द्यावी, अशी विनंती पाटील यांना केली आहे. त्यामुळे आता कारखान्यावर जप्तीची कारवाई होणार की सहकारमंत्र्यांच्या सहकार्याने ती टळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
संचालक मंडळ प्रयत्नशील
राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जाचा विषय मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. बँकेकडे मालतारण असलेल्या साखरेच्या विक्रीतून सुमारे ३१ कोटी रुपये कमी होतील.
उर्वरित कर्जफेडीसाठी १५ दिवसांत मार्ग निघेल. त्यामुळे १४ डिसेंबरला होणारी जप्तीची कारवाई स्थगित करावी अशी विनंती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केली आहे.-भगीरथ भालके, अध्यक्ष श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज