टीम मंगळवेढा टाईम्स ।
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात आली.
तर काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रतिनिधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावर मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुख्य सचिव सिताराम खुंटे उपस्थित होते.
त्यावेळी मराठा समाजाला मागास घोषित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात येण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.
त्याचबरोबर बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेवर देखील चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे मराठा समाज नाराज होता. मात्र, त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक बोलवावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज