टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे.
मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येथे पुतळा असायला हवा या विचारातून अभिजीत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.
गेल्या २५ वर्षांपासून होत असलेल्या शिवभक्तांच्या मागणीचा विचार कुणाकडूनच होत नव्हता. त्यानंतर मंगळवेढेकरांनी यासंबंधी सुरु केलेली “सह्यांची मोहीम” सुरु केली बद्दल अभिजीत पाटील यांनी तेथे पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येत आहे.
मंगळवेढा नगरपालिका मुख्यधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या कडून माहिती घेतली अभिजीत पाटील यांना लक्षात आले. त्यानंतर एक शिवभक्त म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांना वाटले आणि एक भव्य अश्वरूढ पुतळा देण्याची तयारी अभिजीत पाटील यांनी दर्शवली.
त्यासाठी लागणारी जागा आणि परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार स्वप्नील रावडे, नगराध्यक्ष सौ.अरुणा माळी, नगरपालिका मुख्यधिकारी निशिकांत पंरचडराव तसेच प्रशांत गायकवाड,ज्ञानेश्वर कोंडूभैंरी अध्यक्ष सार्वजनिक शिवजंयती मंडळ यांच्याकडे अभिजीत पाटील यांनी दिले आहे.
अभिजीत पाटील यांच्या या भूमिकेचे मंगळवेढ्यातील नागरिकांकडून स्वागत होत आहे तसेच नवतरुण शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्याला यामुळे एक पूर्णत्व नक्कीच येईल. संबंधित अधिकारी वर्गाकडून हा ठराव कधी मंजूर होईल याची प्रतिक्षा शिवभक्तांना लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज