मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शेतातील खांब पडल्यावरून बसवून घेण्यासाठी 850 रुपये का मागितले, या कारणावरून गणेश ढोणे यांचा खून केल्याप्रकरणी विष्णू सुळसह 6 जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मोहोळ तालुक्यातील औंढी गावात राहणारे अनिल मारूती ढोणे व त्यांचे भाऊ गणेश मारूती ढोणे यांच्या शेतातील विद्युत खांब वार्याने पडला होता. त्याच खांबावरून पांडुरंग अंकुश सुळ यांनीही त्यांच्या शेतात मोटारीचे कनेक्शन घेतले होते. हा पडलेला खांब परत उभा करण्यासाठी सुळ आणि ढोणे यांनी निम्मा निम्मा खर्च करण्याचे ठरले होते.
तेव्हा अनिल ढोणे व त्यांचा भाऊ गणेश ढोणे यांनी रवींद्र भुसे, दामाजी शिंदे यांच्याकडून विद्युत खांब उभा केला व त्याची मजुरी 1700 रुपये त्यांना दिली.
अशा आशयाची फिर्याद मयत गणेश ढोणे यांचे बंधू अनिल ढोणे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून विष्णू सुळसह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला. सदरचा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांच्या कोर्टात चालला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी विष्णु अंकुश सुळ (वय 25) पांडुरंग अंकुश सुळ (वय 27), सुभाष ज्ञानोबा सोलनकर (वय 46), अर्जुन पांडुरंग मदने (वय 44), संजय शामराव मदने (वय 30) अशा 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, मुळ फिर्यादीच्या वतीने अॅड. जयदीप माने, तर आरोपींच्या वतीने अॅड. पी.बी.शेंडे, फताटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून धर्मे यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज