टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा आज सकाळी काढण्यात आला.
येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास हाच मोर्चा मुंबईला घेऊन जाणार असल्याचे मराठा समाज आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मागील काही दिवसांपासून वैराग येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ४० दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू आहे. याच साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
याशिवाय ट्रॅक्टर मोर्चा हा मुंबईपर्यंत काढण्यात येणार आहे, त्यासाठीही आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केला आहे. या मोर्चा बार्शी तालुक्यातील ५२ गावातील समाजबांधव सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
या आंदोलनामुळे वैराग शहरातील वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यामुळे बार्शीला जात असलेल्या वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा फटका बसला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज