मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारने मुळ स्वरूपातच मान्यता दिली आहे. त्यानूसार आज शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुळ योजनेला १० कोटी रूपयांचा टोकन निधी जलसंपदा विभागातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ३५ गावांचा दुष्काळ हटण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान या योजने संदर्भात अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असले तरी विशेष पाठपुरावा हा आ.भारत भालके यांनी केले आहेत.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केला. यामध्ये जलसंपदा विभागासाठी १० हजार कोटी रूपयांहून अधिकची तरतूद केली आहे.
यामध्येच मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ३५ गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी १० कोटी रूपयांचा टोकन निधी मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे हा निधी मंजूर करताना शासनाने सप्टेंबर २०१४ साली मंजूर केलेल्या मुळ योजनेलाच मान्यता देऊन त्या योजनेतील समाविष्ट सर्व गावे, लाभार्थी सर्व सिंचन क्षेत्र मान्य करून टोकन निधी म्हणून १० कोटी रूपये दिले आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज