टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘राजा का बेटा अभी राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही हकदार बनेगा’ या आ. भारत भालके यांच्या २००९ सालच्या निवडणुकीतील विधानाची डिव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी शोकसभेत आठवण करून दिली.
अन् एकप्रकारे मतदारसंघाच्या ‘बदलत्या राजकारणाचा’ गर्भित असा अभिजात अर्थ सांगताना भालकेचा वारस विचारांचा की रक्ताचा होणार ? याबाबतही प्रश्नचिन्ह उभा केले.
कै.आ.भारत भालके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी तनपुरे महाराज मठात श्रध्दांजली सभा झाली.या शोकसभेत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
या शोकसभेत सर्वपक्षीय नेते तसेच विठ्ठल परिवारांकडून प्रामुख्याने भगीरथ भालके यांचे नाव अग्रक्रमाने पोटनिवडणुकीसाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत कै.आमदार भारत भालके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सन २००९ सालचे काय होते भारत भालकेंचे विधान?
सन २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरात विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार होते.यावेळी मोहिते-पाटील यांना विधानसभेत बिनविरोध पाठवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. अशातच मोहिते पाटील यांना थेट आव्हान भारत भालके यांनी दिले होते.यावेळी त्यांनी प्रचारात राजा का बेटा अभी राजा नही बनेगा, जो काबिल होगा बकी हकदार बनेगा’ अशी कोटी करत आपणच विधानसभेसाठी ‘सक्षम’ असल्याचे मतदारसंघाला पटवून दिले. आणि आमदारकीचा ताज भालकेंनी जनमतांवर मिळवला होता.
याप्रसंगीच डिव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी सन २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीतील भारतनानांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांच्या आठवणी जागवल्या , आणि विट्ठल परिवाराच्या नेते ” पदासाठी सक्षम व्यक्तींची गरज असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचविले.
अभितीत पाटील यांची गेल्या काही महिन्यामध्ये विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांशी जवळीक वाढलेली दिसून येत आहे.
यामध्येच आगामी तीन महिन्याच्या आसपास होणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी देखिल पाटील इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी तयारीही सुरू ठेवली आहे. यामध्ये विठ्ठल परिवारातील प्रस्थापितांपासून दुरावलेल्या नेतेमंडळीशी ते वारंवार हितगुज करतात.
अभिजीत पाटील यांनी थेट भालकेंच्या श्रध्दांजली सभेच्या निमित्ताने आमदार भारतनानांच्याच विधानाच्या आठवणीना उजाळा देताना मतदारसंघातील जनतेला एकप्रकारे बदलत्या राजकारणाचा अभिजात असा गर्भित संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा राजकीय पंडीताकडून होत आहे.
पाटील यांनी जो काबिल होगा वही हकदार बनेगा असा शेर सांगत असताना एकीकडे भगीरथ भालके यांनी पितृशोक मनात ठेवत कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली तर मतदारसंघातील सहकाऱ्यांच्या सुख- दु : खात सहभागी होण्यास ते सक्रीय झाले.
खरंतर भगीरथ भालके यांना आगमी काळात मार्गक्रमकण करताना सहानभुती वगळता, प्रत्येक राजकीय पाऊल टाकणे सोपे नाही. त्यांना स्वत : ला सर्वच कसोट्यांवर सिद्ध करावे लागणार आहे.
तर दुसरीकडे ‘काबिल’ पणाच्या गोष्टी करणाऱ्या अभितीत पाटील यांनी तीन खासगी कारखाने सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर चांगल्या पद्धतीने चालवून स्वत : ला सिध्द केले आहे. आणि हीच बाब निश्चितच बदलाची ‘ नांदी ‘ ठरणारी असू शकते.
आगामी काळात विठ्ठल कारखाना असो, अथवा कुठल्याही प्रकारची निवडणूक असो, यामध्ये विठ्ठल परिवाराची मोट बांधून पुढे चालण्याचे काम अभिजीत पाटील यांच्याकडून होऊ शकते.
तसेच आ.भालके यांचा कार्यकर्त्यांनी विठ्ठल परिवारासाठी वेगळा वारसदार निवडला तर निश्चितच त्याला तगडे आव्हान देण्याचे काम पाटील यांच्याकडून झाले तर आश्चर्य वाटायला नको.(source : संकेत कुलकर्णी, तरुण भारत संवाद)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज