टीम मंगळवेढा टाईम्स ।
युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी पट्यात येणाऱ्या सलगर बुद्रुक सह परिसरातील गावांमध्ये अजूनही व्यवस्थित पोहचले नाही.
त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रमाणेच बहिष्कार घालणार असा निर्णय सलगर बुद्रुक वासीय घेन्याच्या तयारीत आहेत.
27 मार्च 1986 रोजी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाचे उद्घाटन पार पडले.या सिंचन योजनेची पहिली पाणी चाचणी 1 मार्च 1999 रोजी घेण्यात आली.ही सिंचन योजना सुरू होऊन तब्बल 38 वर्षे उलटून गेली आहेत.तरीही हक्काच्या पाण्यापासून सलगर बुद्रुक व परिसरातील गावे तहानलेलीच आहेत.
कामे अपूर्ण आणि पाणी वाटप कमी-गेल्या दोन वर्षांपासून सलगर बुद्रुक येथे म्हैसाळचे पाणी गावातील ठराविक भागात येत आहे.पण सलगर हे गाव या योजनेतील शेवटच्या गावांपैकी एक गाव आहे.त्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांची तहान भागल्यानंतरच पाणी सलगर करांच्या वाट्याला येत आहे.
त्यामुळे पाणी वाटपात होणारा अन्याय आपण का खपवून घ्यायचा असा सवाल सलगर कर उपस्थित करत आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी या प्रश्नी बैठक बोलावली होती.
येत्या दोन दिवसात पाणी नाही आल्यास परत एक अशीच बैठक बोलवून येणाऱ्या लोकसभा व विधासनसभेच्या निवडणुकीवर पुन्हा बहिष्कार टाकणार अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली.याला सर्व ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला.
बैठकीतच आमदारांचा फोन अन.. – पाणी प्रश्नासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गावातील प्रमुख व्यक्तींची भाषणे सुरू होती.या बैठकीची माहिती कळताच आमदार समाधान आवताडे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला.गावकऱ्यांचे गाऱ्हाणे एकूण घेतले.व याप्रश्नी तात्काळ लक्ष घालून येत्या दोन दिवसात याप्रश्नी बैठकीसाठी योजनेतील अधिकाऱ्यांसमवेत गावाला भेट देतो असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बैठक आटोपती घेतली.
आमच्या गावाला मैसाळ योजनेचे पाणी मंजूर असून सुद्धा व्यवस्थित मिळत नाही
#कायम दुष्काळी असलेल्या आमच्या गावाला मैसाळ योजनेचे पाणी मंजूर असून सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. शिवाय या योजनेतील बरीच कामे कासावगतीने होत आहेत.शेजारील जत तालुक्यातील गावांमध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू असतो.त्यामुळे आम्हाला पाणी नाही मिळाल्यास,हक्काच्या पाण्यासाठी 2009 प्रमाणेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालन्याविषयी विचार करत आहोत.-शिवशंकर धायगोंडे,शेतकरी सलगर बुद्रुक-
येत्या दोन ते तीन दिवसात सलगर बुद्रुकला पाणी सोडण्यासाठी सांगितले
सलगर बुद्रुक व परिसरातील गावांमध्ये पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती आहे.पाणी प्रश्नासंदर्भात आयोजित केलेल्या गावकऱ्यांच्या बैठकी बाबत कळताच मी गाकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.व लगेचच म्हैसाळ योजनेतील संबधीत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून येत्या दोन ते तीन दिवसात सलगर बुद्रुकला पाणी सोडण्यासाठी सांगितले आहे.- समाधान आवताडे-आमदार मंगळवेढा –
गावांना पाणी देणेचे नियोजन आहे
मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात 19 गावे असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे टेल टू हेड याप्रमाणे प्रत्येक गावांतील
मागणीनुसार पाणी देणे आले आहे. सद्य परिस्थितीत सलगर बुद्रुक आणि सलगर खुर्द या गावांतून मागण्या येत असून म्हैसाळ योजनेच्या उर्वरित लाभक्षेत्रातील गावांना पाणी दिले नंतर 4 ते 5 दिवसांत या गावांना पाणी देणेचे नियोजन आहे.- महेश पाटील,अधिकारी मैसाळ योजना जलपंदा विभाग सांगली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज