मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जमावबंदी असतानाही नगरपालिका हद्दीत पाचपेक्षा अधिक लोक एकत्र करून मंदीराजवळ गप्पा मारनाऱ्या तिघांना चांगलेच महागात पडले आसून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपी विनायक मारुती ढावरे,महेश सुर्यकांत काशिद (वय 27),राजेंद्र लक्ष्मण वाकडे (वय 38) सर्व रा.खंडोबा गल्ली या तीघांविरूध्द गुन्हा दाखलझाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,सध्या राज्यात कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास जमावबंदी आदेश जारी केला आहे.
मंगळवेढा शहरातील खंडोबा गल्लीत दि.24 रोजी 3.30 च्या दरम्यान शहरातील नगरपालिका हद्दीतील खंडोबा गल्लीतील खंडोबा मंदिरासमोर वरील तीन आरोपींनी 10 ते 15 लोक एकत्रीत जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केला असल्याची फिर्याद पोलिस शिपाई नागनाथ डबरे यांनी दिल्यानंतर वरील तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज