(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत पगार व सर्व प्रलंबित देणी मिळविण्यासाठी यापुढे तीव्र संघर्ष उभारण्यात येणार आहे. प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर मार्ग न निघाल्यास कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय कारखाना कार्यस्थळावरील बैठकीत घेण्यात आला.
याचवेळी कामगार आंदोलनाचे नेतृत्व कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांच्याकडे देण्याची घोषणाही करण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे यंदा प्रथमच कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवण्यात आला आहे. त्यातच कामगारांचे पगार व इतर देणी अनेक महिन्यांपासून थकल्याने असंतोष व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर यापूर्वी आंदोलनेही झाली आहेत.
दरम्यान,कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै.औदुंबरअण्णा पाटील यांच्या पुतळ्यासमोर कामगारांची बैठक झाली. यावेळी कामगारांच्या प्रश्नांवर पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा झाली. कारखाना प्रशासनाशी बोलणी करणे, कायदेशीर लढा देणे व आंदोलनात्मक भूमिका ठरविण्याचे अधिकार अमरजित पाटील यांना देण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज