टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातील अतिरिक्त पाणी भीमा नदीत पात्रात सोडल्यामुळे झालेल्या पुरसदृस्य परिस्थितीमुळे सिद्धापूर येथील वडापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या परिसरातील नागरिकांचा मंगळवेढा व मोहोळ तसेच दक्षिण सोलापूर या तालुक्याशी असणारा संपर्क या निमित्ताने तुटला.
आज सकाळपासून बंधार्यावरून पाणी वाहत होते. गतवर्षी पुरसदृश्य परिस्थिती झाल्यामुळे भीमा कालवा मंडळाच्या निष्काळजीपणामुळे बंधाऱ्यातून
काढलेली दारे बंधाऱ्यावर तशीच ठेवण्यात आली. व ती उचलण्यास हलगर्जीपणा केल्यामुळे या बंदराची दारे वाहून गेली.
शिवाय गतवर्षी या बंधाऱ्याच्या एका बाजूचा भराव देखील वाहून गेला होता. त्यामुळे पाणीसाठा कमी राहिल्याने या भागातील शेतीचे नुकसान झाले.
त्यानंतर जकराया साखर कारखान्याने यामध्ये सहभाग नोंदवत हा भराव भरून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी योगदान दिले.
शासनाकडून निधी मिळाला मात्र पिंचीगचे काम व्यवस्थित झाले नसल्याची या भागातील शेतकऱ्याची तक्रार आहे.
बंधाऱ्याची दारे काढून सुरक्षित ठेवली आहेत त्याचबरोबर उजनी धरणातून आज सकाळी उजनीतून सोडलेल्या पाण्याबरोबर वीर धरणातील पाणी निरा नदीत सोडल्यामुळे जवळपास 63 हजार व्युक्सेक्स विसर्ग नदीपात्रात आहे. त्याचा फटका तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्याच्या शेती पिकाला बसला.
माचनुर येथील जटाशंकर मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर वडापूर बंधारा देखील आता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हळूहळू या नदीपात्रातील पाणी नजीकच्या बागायत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कारणीभूत ठरणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडले आहे. त्याचा इशारा सतर्कतेचा दिला असला तरी नुकसानीबाबत कोण गांभीर्याने घेणार असा सवाल या भागातील शेतकऱ्यातून विचारला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज