मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोघां ऊसतोड मजुरांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास भेंड (ता़ माढा) येथे घडली.
-वाचा : मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात भाजपचे मिशन लॉटस लवकरच ‘या’ नेत्याचे भाकीत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील भेंड येथील शैलेश भारत दोशी यांच्या गट क्रमांक १९१ च्या हद्दीतील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले एक ऊसतोड मजूर गेला होता़ त्यावेळी विहिरीत खाली उतरत असताना अचानक पाय घसरला अन् तो पाण्यात पडला़ पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत होता़ त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या ऊसतोड मजूराने प्रयत्न केला मात्र त्याचाही पाय घसरल्याने तोही पाण्यात पडला़ त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी सकाळी घडली
-सोलापुरातील ‘या बँकांचे’ 12 कोटी ‘येस बँकेत’ अडकले!
भगवान उत्तम चौधरी ( वय ४०, रा़ मादळमोही ता गेवराई, जि़ बीड) व राजू रावसाहेब माळी ( वय ४२, रा. चंदनापरी, पो तालेवाडी, ता. अंबड जि जालना) या दोघांचा त्या मृतांमध्ये समावेश आहे. दुपारी बारापर्यंत विहिरीतून भगवान चौधरी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे परंतु राजू माळी यांचा मृतदेह सापडला नाही. त्याचा शोध घेतला जात असून त्यासाठी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व त्यांचे पथक प्रयत्न करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज