मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेला आज मंगळवार दि.१८ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे. यावर्षी १२ वीच्या परीक्षेला मंगळवेढा तालुक्यातून २ हजार ८३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. कॉपी मुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
शालेय व कनिष्ठ महविद्यालय जीवनात प्रचंड महत्व असणार्या १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च मधील परीक्षांना सुरूवात आजपासून होत आहे. परीक्षेसाठी शिक्षणविभागातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कॉपीमुक्त अभियान प्रभावी पध्दतीने राबविण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट शाळा-महाविद्यालयातून व ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.
याकरीता परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जावून तेथे विद्यार्थ्याचा आसन क्रमांक दिल्यानंतर ऑनलाईन हॉलतिकीट तयार होईल. त्याची प्रिंट काढून वापर करता येणार आहे.
मंगळवेढा तालुक्यामधून १२ वीला ५ परीक्षाकेंद्रे असून यामध्ये इंग्लिश स्कूल,मंगळवेढा– ९२९, दामाजी महाविद्यालय – ४५६, येड्राव आश्रमशाळा –४११, आश्रमशाळा बालाजीनगर – ४२५ व मानसिंगका विद्यालय सोडडी –२७० व श्री.बाळकृष्ण विद्यालय ३४५ विद्यार्थी असे एकूण परीक्षेला २ हजार ८३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे.
परीक्षाकाळात सर्व केद्रांच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागु करण्यात येणार आहे.यावेळी परिसरातील सर्व झेरॉक्सची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.सर्व केद्रांच्या परिसरात पोलीस बंदाबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 20 मिनिट आधी उत्तर पत्रिका व 10 मिनिट आधी प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज