mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

26/11 अटॅक! मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण; वाचा संपूर्ण थरारक घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 26, 2021
in राज्य, राष्ट्रीय
26/11 अटॅक! मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण; वाचा संपूर्ण थरारक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली होती.

मुंबईतील ती काळरात्र आठवली की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. आजच्या दिवशी २००८ साली मुंबई संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे गजबजून गेली होती.

मुंबई स्थिती सामान्य होती. लोकं बाजारात खरेदी करत होते, तर काही लोकं मरीन ड्राईव्हवर रोजच्याप्रमाणे समुद्रातून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेत होते.

परंतु जसजशी रात्र पुढे सरत गेली मुंबईच्या काही रस्त्यांवर आरडाओरडा सुरू झाला. याच दिवशी पाकिस्तानमधून आलेले जैश-ए-मोहम्मदचे १० दशतवाद्यांनी मुंबईत बॉम्ब हल्ला केला आणि गोळीबार केला.

या दहशतवाद्यादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु हा भारताच्या इतिहासातील काळ दिवस होता. हा दिवस कोणीच विसरू शकत नाही.

या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास १६६ लोकं मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोकं जखमी झाले होते.

या हल्ल्याच्या तीन दिवसापूर्वी २३ नोव्हेंबरला कराचीहून समुद्र मार्गे एका बोटीतून हे दहशतवादी मुंबईत पोहेचले होते. ज्या बोटीतून दहशतवादी आले होते ती भारतीय होती आणि दहशतवाद्यांनी त्या बोटीवरील चार भारतीय प्रवाशांना मारून बोटीवर कब्जा केला होता.

सुमारे ८ वाजता हे दहशतवादी कुलाबाजवळील कफ परेडच्या मासे बाजारात उतरले. येथून हे दहशतवादी चार गटात विभागले. त्यानंतर टॅक्सी पकडून आपाआपल्या ठिकाणी गेले.

असे म्हटले जाते की, जेव्हा दहशतवादी मासे बाजारात उतरले होते तेव्हा त्यांना पाहून मच्छिमारांना संशय आला होता. याबाबतची माहिती मच्छिमारांनी स्थानिक पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही.

त्यानंतर रात्री ९.३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीएसएमटी स्थानकांवरील मुख्य हॉलमध्ये दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

या दहशतवाद्यांमध्ये एक मोहम्मद अजमल कसाब होता ज्याला फाशी देण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलमधून १५ मिनिट गोळीबार केला. ज्यामध्ये ५२ लोकं मृत्यूमुखी पडले होते आणि १०० हून अधिक लोकं जखमी झाले होते.

दहशतावाद्यांचा हा गोळीबार फक्त सीएसएमटी पुरता मर्यादित नव्हता. दक्षिण मुंबईच्या लिओपोल्ट कॅफेमध्ये देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. मुंबईतील लोकप्रिय कॅफेपैकी एक लिओपोल्ट कॅफे आहे.

या कॅफेमध्ये गोळीबार करून १० लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. यामध्ये काहीजण परदेशी होती. १८७१ पासून सुरू असलेल्या या कॅफेच्या भिंतींवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचे निशाण अजूनही आहेत.

दरम्यान रात्री १०.३० वाजता विलेपार्लेमधील एका टॅक्सीला बॉम्बने उडवल्याचे समोर आले. ज्यामध्ये चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेच्या १५-२० मिनिटांपूर्वी बोरीबंदरमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले होते.

ज्यामध्ये टॅक्सी चालक आणि दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये १५ लोकं जखमी झाले होते.

भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांना निशाणा ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट आणि नरीमन हाऊसवर देखील होता.

जेव्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला त्यावेळेस ४५० आणि ओबेरॉयमध्ये ३८० लोकं उपस्थितीत होते. या सर्व लोकांसाठी ती एक भयानक रात्र होती. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच २७ नोव्हेंबरला ताज हॉटेलमधील सर्व लोकांची सुटका झाल्याचे समोर आले.

परंतु अजूनही काही लोकं दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत, ज्यामध्ये काही परदेशी नागरिक आहेत, अशी बातमी आली होती.

दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन्ही हॉटेलला रॅपिड अॅक्श फोर्स (आरपीएक), मरीन कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या कमांडरांनी घरले होते. परंतु माध्यमांच्या लाईव्ह कव्हरेजमुळे सुरक्षा दलाच्या सर्व हालचालींची माहिती टीव्हीवरून दहशतवाद्यांना मिळत होती.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस ही चकमक सुरू राहिली होती. यादरम्यान मुंबईत हल्ले झाले, आग लागली, गोळीबार झाला होता. मुंबई आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील १.२५ अब्ज लोकांच्या नजरा ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसवर खिळल्या होत्या.

ज्या दिवशी ताज हॉटेलवर हल्ला झाला, त्या दिवशी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या संसदीय समितीचे अनेक सदस्य हॉटेलमध्ये थांबले होते, तरीही त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही. २९ नोव्हेंबरच्या सकाळीपर्यंत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते आणि कसाब पोलिसांच्या ताब्यात होता.

मुंबईतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली होती, पण या दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ जणांनी आपले प्राण गमावले.(स्रोत:My महानगर)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: 26/11 अटॅक मुंबई

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 25, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 25, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 25, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तीस दिवसांत पालकांचे घर सोडा! आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा-सून घरात राहू शकत नाहीत; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

June 23, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदय पिळवटणारी घटना! परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत पोटच्या लेकीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच…

June 23, 2025
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

सरकार लाडक्या बहिणींना खुश करणार! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा; आता लाडक्या बहिणींना मिळणार ९ टक्के व्याजाने ‘इतक्या’ लाखापर्यंत कर्ज

June 22, 2025
Next Post

गेल्या पंचवीस वर्षात जमले नाही, ते आ.समाधान आवताडे करून दाखवणार सरकारला धारेवर धरणार 'शिवणगी'त दिला शब्द

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 25, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा