टीम मंगळवेढा टाईम्स।
कमी दाबाचे पट्टे व हवेच्या चक्रीय स्थितीमुळे पुढील सात दिवस आकाश अंशत : ढगाळ राहणार आहे.
शिवाय किमान तापमानातही घट होणार असल्याचा अंदाज कृषी हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे.
काही भागात गारपीटही झाली होती. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कृषी हवामान विभागाने सांगितल्यानुसार, पुढील सहा दिवस आकाश अंशत : ढगाळ राहणार आहे.
कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असणार असून , किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस असे राहणार आहे.
सकाळची आर्द्रता ६५ ते ७० टक्के तर दुपारची आर्द्रता ३० ते ३१ टक्के राहणार आहे. वाऱ्याचा वेग कमी अधिक होणार आहे.(स्रोत:लोकमत)
शेतकऱ्यांनो, हे करा…
■ आंब्याला मोहोर येऊन चांगली फळधारणा होण्यासाठी ०:५२:३४ हे विद्राव्य खत १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यातून फवारावे.
■ आंबा मोहोर गळू नये यासाठी इमिडॅक्लोप्रीड १ मिली प्रति लीटर व पोटॅशियम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारावे.
■ हरभरा व करडईमध्ये अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
■ मिरचीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारावे.
■ रब्बी ज्वारीस पोटरीत व फुलोरा अवस्थेत एक पाणी द्यावे.
■ शेवग्यावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस १ मिली प्रति १ लीटर पाण्यातून फवारणी करावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज