मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ठाकरे सरकार हे 11 दिवसात कोसळेल, असं भाकीत भाजप नेते नारायण राणे यांनी केलंय. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी महाविकासआघाडीचं सरकार अकरा दिवसांत पडेल, असं भाकीत केलंय.
राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राणे म्हणाले. पण मी त्यांच्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का?
हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असं भाकीत नारायण राणेंनी केलंय. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिली. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे.
फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा घणाघाती आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.
सुधारित नागरीकत्व कायद्या संदर्भात शिवसेनेने सुरुवातीला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यसभेत त्यांनी पटली मारली. मात्र, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांची भूमिका बदलली हे चांगले झाल्याचं राणे यांनी सांगितले. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजप, सेना भविष्यात एकत्र येतील का? यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नाही. त्यासाठी ज्योतिषाकडे जावं लागेल, पण भविष्यात काहीही होऊ शकत, अशी समीकरणं मीडियातून दिसून येत असल्याचंही राणे म्हणाले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ठाकरे सरकार हे 11 दिवसात कोसळेल, असं भाकीत भाजप नेते नारायण राणे यांनी केलंय. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी महाविकासआघाडीचं सरकार अकरा दिवसांत पडेल, असं भाकीत केलंय.
राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राणे म्हणाले. पण मी त्यांच्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का?
हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असं भाकीत नारायण राणेंनी केलंय. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिली. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे.
फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा घणाघाती आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.
सुधारित नागरीकत्व कायद्या संदर्भात शिवसेनेने सुरुवातीला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यसभेत त्यांनी पटली मारली. मात्र, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांची भूमिका बदलली हे चांगले झाल्याचं राणे यांनी सांगितले. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजप, सेना भविष्यात एकत्र येतील का? यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नाही. त्यासाठी ज्योतिषाकडे जावं लागेल, पण भविष्यात काहीही होऊ शकत, अशी समीकरणं मीडियातून दिसून येत असल्याचंही राणे म्हणाले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज