टीम मंगळवेढा टाईम्स ।
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला असून सामन्यात रोमांचक विजय मिळवला आहे.
न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यापूर्वी सामन्याच्या अर्धातासापूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस खेळवला गेला.
हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान दिले. टीम इंडियाने पाकिस्तानी गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या.
पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारतानं पाकिस्तान समोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं चांगली गोलंदाजी केली. भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत करत रोमहर्षक विजय मिळवला.
पाकिस्तानकडून बाबर आझमनं 13 धावा केल्या. बाबर आझमला जसप्रीत बुमराहनं बाद केलं. अक्षर पटेलनं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. उस्मान खान 13 धावा करुन बाद झाला. हार्दिक पांड्यानं भारताला तिसरं यश मिळवून दिलं.
फकर झमान 13 धावा करुन बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहनं भारताला चौथं आणि महत्त्वाचं यश मिळवून दिलं. मोहम्मद रिझवानला जसप्रीत बुमराहनं 31 धावांवर बाद केलं. हार्दिक पांड्यानं शादाब खानला 4 धावांवर बाद केलं. जसप्रीत बुमरहानं इफ्तिखारला बाद केलं.
भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा तीन विकेट घेतल्या. आणि हार्दिक पांड्यानं पाकिस्तानच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अक्षर पटेलनं देखील महत्त्वाची विकेट घेतली. अर्शदीप सिंगनं इमाद वसीमला बाद केलं.
भारताच्या 119 धावा
भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि रोहित शर्मानं केली होती. आज भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरले. विराट कोहली 4 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या रुपात बसला.
रोहित शर्मा 13 धावा करुन बाद झाला. रिषभ पंत आणि अक्षर पटेलच्या भागिदारीनं भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. अक्षर पटेलनं 20 केल्या. रिषभ पंतनं केलेल्या 42 धावांच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या. भारतानं अखेरच्या 30 रनमध्ये 7 विकेट गमावल्या.
भारताच्या फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावांपर्यंत मजल मारली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज