टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीच्या ११४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अतिक्रमण केल्याच्या आहेत तर तीन अपत्ये असलेल्या १५ तक्रारींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमोर सुनावणी सुरू असून यापैकी २० प्रकरणांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
तक्रार सिध्द झाल्यास संबंधित सदस्यावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याने या सदस्यावर आता कारवाईची टांगती तलवार असणार जिल्ह्यातील ग्रामपंचाय सदस्यांनी अतिक्रमण केल्याच्या ७३ तक्रारी दाखल आहेत.
तिसरे अपत्य असलेल्या १५ , पदाचा गैरवापर केल्याच्या ७ , वय कमी असल्याच्या ३ , निवडणूक वाद ३ , ग्रामसभेला उपस्थित न राहण्याच्या ३ , शौचालय नसलेल्या ३ , बनावट दाखले सादर केलेल्या ३ तर
कर भरणा न केल्याच्या ६ अशा जवळपास ११४ तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल असून त्यावर लवकरच सुनावणी घेऊन त्या निकाली काढण्यात येणार असल्याची महिती दिली आहे.
त्यामुळे या सदस्यांवर आता कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज