टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या वाड्या वस्तीवर जबरी चोरीचे प्रमाण वाढले आहे त्याकरिता पोलीस दलाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील नागरिकांनी योग्य बरदारी घेणे आवश्यक आहे प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दलाची गस्त ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिली आहे.
आरडा-ओरड करून लोकांना सूचित करावे
रात्री झोपताना घराला आतून कडी, कोयंडा लावणे गरजेचे आहे.वाडी वस्तीवर काही संशयास्पद हालचाली दिसताच आरडा ओरड करून वाडीवरील लोकांना सूचित करावे पोलीस पाटील यांना कळवणे गरजेचे बनले आहे.
घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये
घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत ते बँकेत सुरक्षीत लाकरमध्ये ठेवावेत. दिवसा अनोळखी व्यक्ती गावात किंवा शेत वस्तीवर संशयितरित्या फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
व्यवसायाच्या ठिकाणी, घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहिती असावे करुन घ्यावेत.
महिलांनी बाहेर जाताना कमीत कमी दागिने घालून जावे
कोणताही आर्थिक व्यवहार किंवा इतर खरेदी-विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावे, महिलांनी बाजारामध्ये जाताना , गर्दीच्या ठिकाणी जाताना अथवा कार्यक्रमाला जाताना कमीत कमी दागिने घालून जावे.
कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यन्त रेकी करीत येवू शकतात. या साठी नागरिकांनी नेहमी सतर्क व जागरुक राहावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
आपल्या परिसरात अशा घटना घडताना 02188-220333 या मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक रंणजीत माने यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज