मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील अतिक्रमणा काढण्यासाठी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मंगळवेढा या सामाजिक संघटनेने नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मंगळवेढा शहरांमध्ये अतिक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणात झाले असल्यामूळे शाळेतील मुलाना व जेष्ट नागरिकाना खुप त्रास होत आहे.अतिक्रमनां मुळे दामाजी चौक,शिवप्रेमी चौक,बस स्टँड व इतर चौकात खुप त्रास सहन करावा लागत असल्यामूळे लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यासाठी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मंगळवेढा या सामाजिक संघटनेने मंगळवेढा शहरातील संपूर्ण आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचे अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन देऊन व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून व जिल्हाधिकारी यांनी पत्र देऊन सुद्धा अतिक्रमण धारकांवर कारवाई केलेली नाही.
दरम्यान मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.पल्लवी पाटील या सर्वोच्च न्यायालय व जिल्हाधिकारी यांचे आदेश पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.लवकरात लवकर मंगळवेढा शहरातील आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचे अतिक्रमण काढले नाही तर राजे प्रतिष्ठान तीव्र आंदोलन करेल व नीवेदन दयाला गेल्यास 353 गुन्ह्याची भिती दाखवतात खोटे अश्वासन देवुन उपोषणा पासुन परावृत्त केले.
तरी लवकरात लवकर अतिक्रमण धारकावर कारवाई करावी. नाहितर राजे प्रतिष्ठान तिव्र अंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी.पल्लवी पाटील यांच्यावर राहील असा इशारा राजे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज