टीम मंगळवेढा टाइम्स ।
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात असून, १५ मार्चदरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे.
पोलिस विभागातील २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यातील १०९ जणांची त्यांच्याच जिल्ह्यात सहायक पदावर बदली झाली आहे. यात अनियमिता असल्याने अनेक जण मॅटमध्ये गेले आहेत.
यात अनियमितता असल्याने संबंधित बदल्या रद्द करून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्याबाहेर त्यांच्या नव्याने बदल्या करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत,
अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी सोलापुरात दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. याच दरम्यान बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी त्यांची देखील मुख्य निवडणूक अधिकारी या पदावरून बदली झाली आहे.
त्यांच्या बदलीबद्दल त्यांना विचारले असता बदल्यांची सवय आहे, असे ते म्हणाले. प्रशासनात राहून बदल्यांची सवय लावून घ्यावी लागते.
नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम हे देखील पूर्ण ताकदीने काम करतील, असेही ते म्हणाले. गुरुवारी दुपारी नियोजन भवनच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तयारीची माहिती दिली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज