मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात रविवारी जनता कर्फ्यू लागणार 22 मार्च, रविवारी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं पालन करा जनता कर्फ्यूचं पालन करत आत्मसंयम आणि देशहितार्थ कर्तव्याचं पालन करा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
आणखी एक आग्रह करतो की, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना घरातून बाहेर पडू देऊ नका
60-65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
कोरोनाचं संकट सामान्य बाब नाही संकल्प आणि संयम या दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं देशवासियांना संकल्प आणखी दृढ करावा लागेल की नागरिक म्हणून आम्ही प्रत्येकजण आपल्या कर्तव्यांचं पालन करा,संकटापासून बेसावध राहू नका भारतावर कोरोनाच्या संकटाचा कोणताही परिणाम होणार नाही असा विचार करणं चुकीचं ठरेल.
कोरोनाचं संकट म्हणजे महायुद्धापेक्षा मोठा धोका चिंतेचं वातावरण वाढणं स्वाभाविक आहे.येणाऱ्या काही दिवसांचा तुमचा वेळ मला द्या कोरोना म्हणजे जागतिक महामारी आहे.
मध्यवर्गापासून गरीब वर्गापर्यंत सर्वांनाच कोरोनाची झळ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करु नका त्यांच्यापुढेही कौटुंबीक जबाबदाऱ्या आहेत.
रुग्णालयांवरील ताण वाढू देऊ नका सध्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात जाणं टाळा
याविषयी गरज वाटल्यास डॉक्टरांशी फोनवरच संपर्क साधा शस्त्रक्रीयांची तारीख पुढे ढकलण्याची विनंती पंतप्रधान मोदींनी केली.
जाहिरात :
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज