टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली चार महिने पूर्ण झाले आहेत तरी ऑनलाइन प्रणालीच्या तांत्रिक अडचणीमुळे अद्याप वेतन मिळाले नाही तसेच शासकीय परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीकडून देय असणारा महागाई राहणीमान भत्ता तोही मोजक्या ठराविक ग्रामपंचायत वगळता जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही.
यामुळे कोरोना जन्य अशा आपत्यकालीन परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून कोणत्याही वेळेचे भान न ठेवता रात्रंदिवस गावातील पिण्याचे पाणी पुरवठा करणे, गाव स्वच्छता करणे, गावात दिवाबत्तीची व्यवस्था करणे, कोरोना विषाणूने उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी कोरन टाईम केलेल्या व्यक्तींची व्यवस्था करणे जीव धोक्यात घालून गावात जंतुनाशक फवारणी करणे इत्यादी कामे करूनही सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे.
याविषयी जिल्हा व तालुका ग्रामपंग्रामचायत प्रशासन यांच्याकडे कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, तरी वेळीच दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार महागाई राहणीमान भत्ता, व दरमहा मिळणारे वेतन तातडीने मिळण्याची कार्यवाही व्हावी, अन्यथा आपत्ती जन्य परिस्थितीचा नियम मोडीत काढून प्रशासनाच्या या मनमानी बेशिस्त कारभाराला आळा घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हा सचिव तथा महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य कॉम्रेड संतोष जामदार यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे बाबत व त्यांच्या बाबतीत होत असलेल्या अडचणीला योग्य न्याय देणेबाबत मंगळवेढा तालुका संघटनेकडून आमदार भारत भालके यांना याबाबतचे निवेदन दिले बाबत मंगळवेढा तालुका संघटनेचे सचिव कॉम्रेड नवनाथ कांबळे यांनी सांगितले.
Pay Gram Panchayat employees’ salaries and living standards, pay dearness allowance on time, otherwise they will agitate: Santosh Jamdar
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज