मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून दारूच्या नशेत आत्महत्या केली. आनंदा पांडुरंग दुधाळ (वय 48) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी व दुष्काळाला कंटाळून आनंदा यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत आनंदा दुधाल हे दि.9 मार्च रात्री 11 ते दि.10 मार्च पहाटे 5 च्या पूर्वी राहत्या घरात दारूच्या नशेत घरातील माडीच्या लाकडास असलेल्या लोखंडी कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याची खबर मयताचा भाऊ राजकुमार दुधाळ यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत.
मागील वर्षापासून पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मागे आई-वडील ,पत्नी,दोन मुले,भाऊ,बहिणी असा परिवार आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज