टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरण परिसरात व व भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांनी दिली.
पंढरपुरातील भीमा नदीपात्रामध्ये ६० हजार क्युसेक च्या आसपास पाणी आहे.
यामुळे नदीपात्र वरील जुना दगडी पुल पाण्यामध्ये बुडाला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे, तर वाड्यातील विहीर ओसंडून वाहू लागली आहे.
मागील काही दिवसांपासून पंढरपुर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. काल पटवर्धन कुरोली, व भाळवणी ( ता.पंढरपूर ) मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ या अतिवृष्टीमुळे भाळवणी तेथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे.
वाड्यातील ऐतिहासिक विहीर अतिवृष्टीमुळे वाहू लागली आहे.निसगार्चे हे रौद्ररुप प्रथमच पाहयायला मिळत आसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मागील २० वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावर्षी पंढरपुर तालुक्यात पडला असून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ऐतिहासिक वस्तुंना ही फटका बसत आसल्याचे चित्र आहे.
शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे. तर याच ऐतिहासिक वाड्यातील पाण्याची विहीर इतिहासात प्रथमच ओसंडुन वाहू लागली आहे. निसर्गचया प्रलयातून ऐतिहासिक वास्तू ही सुटत नसल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक वाड्यातील या घटना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
पावसाने भंडीशेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान
पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने भंडीशेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग खचला आहे आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. वरचा बहुतांश भाग वाहून गेल्याने मागील १२ तासांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी तालुक्यातील भाळवणी, भंडीशेगाव सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कासाळ ओढ्याला पूर आला आहे. या ओढ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पूर आल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.
२०११-२०१२ साली नव्याने बांधण्यात आलेल्या भंडीशेगाव येथील पुलावरून हिल्यांदाच पाणी वाहिले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे पंढरपूर – अकलूज, माळशिरस या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या ओढ्यावरील पाण्याची पाहणी करून वाहतूक बंद केली होती.
शनिवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले असले तरी पुलाचे मोठे नुकसान झाले आसल्याचे प्रशासनाचया निदर्शनास आले आहे. शनिवारी सकाळी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पुलाची पाहणी केली.
पुलाचे मोठे नुकसान झाले असून आज दिवसभर वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. पुलाची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा धोकादायक अवस्थेतील पुलावरून वाहतूक सुरू केल्यास एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त आहे.
बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपुर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने पट-कुरोली येथील शेतकरी विजय मोरे यांची शेळी व शेवते येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांचे बोकड फस्त केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.(लोकमत)
The old stone bridge over the Bhimanadi in Pandharpur under water; Alert to citizens
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज