मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले.
त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली…पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला…अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या.
दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.
भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत…आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं…
पाकिस्तानातल्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले…14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं…
भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं…
भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय…भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केलीयत. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ १७ आणि अमेरिकेच्या एका एफ १६ विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला…
भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय…पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ १६ विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत. त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार ते पाहायचंय.
भारतानं जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय…
पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारतीय लष्करानंही आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला…पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जोरदार कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर लक्ष्य करत भारतीय सैनिकांनी त्यांची पळता भुई थोडी केली.
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले
भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालं आहे. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे.
बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. ही घटना म्हणजे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याकडे एक पाऊल असल्याची चर्चा आहे.
पाकिस्तानच्या कुरापतीला उत्तर देताना भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर हल्ला केला. लष्कर, नौदल आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला पुरत नामोहरम केलं. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तामध्येही बंडखोरांनी तोंड वर काढलं.
बलोल आर्मीचा पाकिस्तानवर हल्ला
बलुचिस्तानच्या बंडखोर बलोच आर्मीने पाकिस्तानवर गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा निभाव लागला नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने चौक्या सोडून पळून जाणं पसंत केलं. बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा केल्याचा बलोच लिबरल आर्मीने दावा केला आहे. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानकडे टाकलेलं हे एक पाऊल आहे.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळील भाग बलोच आर्मीच्या ताब्यात गेला आहे. केच, मस्टंग आणि कच्छीमध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. गुरुवारी सकाळी बलोच आर्मीने पाकिस्तानच्या 14 सैनिकांना ब्लास्ट करून ठार केलं होतं. या आधी 11 मार्च 2025 मध्ये बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचंही अपहरण केलं होतं.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा
बलोच लोक हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या काही भागात राहतात. त्यातील बहुतांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी सैन्याने बंदुकीच्या ताकदीवर बलुचिस्तानचा भाग ताब्यात ठेवला आहे. इथले लोक स्वातंत्र्य बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी बलोच लिबरेशन आर्मीही स्थापन करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे.
तुर्कीचे कार्गो विमान कराचीत
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.
सांबा सेक्टरमध्ये जैशचे सात दहशतवादी ठार
जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 जैश दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज