टीम मंगळवेढा टाईम्स । मुसळधार पावसाने सात तास संततधार कायम ठेवल्याने नवी मुंबईच्या नेरुळ व बेलापूर या भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाची मात्र या परतीच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.
सकाळी सात वाजता साफसफाईचे काम करण्यास येणाऱ्या कामगारांना पहाटे पाच वाजता बोलवून गटारांची झाकणे उघडण्यात आल्याने या भागातील पाण्याचा दहा वाजेपर्यंत निचरा होऊ शकला. या मुसळधार पावसाने सिडको, कोकण भवन, टाटा नगर हा नवी मुंबईतील वाणिज्य भाग सकाळी जलमय झाला होता.
नवी मुंबईतील पारसिक डोंगराच्या रांगांमुळे शहरात चार टप्प्यांत पाऊस कोसळत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी, तुर्भे हा भाग ज्या वेळी जलमय होत असतो त्या वेळी नेरुळ, बेलापूर हा उंचावर असलेल्या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नसल्याचे दिसून आले आहे.
मात्र रात्री पावणेबारा वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी सात वाजेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे बेलापूरमधील वाणिज्य भाग व सेक्टर दोन ते सहा या भाग जलमय झाला होता. हा संपूर्ण भाग समुद्रसपाटीपासून थोडा उंचावर असल्याने या भागात जुलै २००७ शिवाय पाणी साचल्याचे नोंद नाही.
या भागात पडणारे पाणी हे खाडी भागाकडे सरकत असल्याने बेलापूरमधील कोकण भवन हा भाग वगळता पाणी साचत नाही. पण या भागात साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त होते. या भागात २७१ मि.मी. पर्यंत सात तासांत पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे सी.बी.डी.तील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.
Navi Mumbai is also waterlogged; An average of 322 mm of rainfall was recorded in two days; Water in low lying areas at CIDCO, Konkan Bhavan, Tata Nagar
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज