टीम मंगळवेढा टाईम्स।
आमदार साहेब… आमच्या भागात एकदा पाणी आणा शेतकरी तुमचा फोटो देव्हाऱ्यात लावेल अशी आर्त विनवणी नंदेश्वर येथील नागरिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा केंद्रबिंदू असलेल्या नंदेश्वर गावात आ.समाधान आवताडे यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी दुष्काळी भागात पाणी आणण्यासंदर्भात विनवणी केली.
यावर आ.अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी बांधणी आणण्याची मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास येण्यासाठी आमचे अगदी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुकूल आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेने थोडा धीर धरावा आपली योजना अगदी दृष्टीक्षेपात आहे असे उत्तर दिले.
मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील 24 गावांनी नुकताच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा व 24 गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्कारच्या निर्णयामुळे आ.आवताडे यांच्या या दुष्काळी भागातील केंद्रबिंदू असलेल्या नंदेश्वर गावाला दिलेल्या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान दुष्काळी भागातील गत आठवडाभरात ज्या ज्या कुटुंबातील व्यक्ति मृत पावल्या आहेत. त्या कुटुंबांना सांत्वन भेटी देण्यासाठी आ.आवताडे हे या भागात आले होते. नंदेश्वर गावातीलही गरंडे कुटुंबाला त्यांनी यावेळी सांत्वनपर भेट दिली.
आ.आवताडे हे नंदेश्वर गावात येणार आहेत याची माहिती लागल्यानंतर नंदेश्वर गावातील सर्व नेतेमंडळी आणि नागरिक बाळकृष्ण महाराजांच्या जुन्या मंदिरासमोर मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. त्यावेळी आ.आवताडे हे तिथे आले आणि चर्चा चालू झाली. चर्चेदरम्यान नागरिकांनी पाणी आणण्यासंदर्भात मागणी केली.
वर्षानुवर्षे मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित राहिला आहे. वेळोवेळीच्या लोकप्रतिनिधींनी पाणी आणण्याचे केवळ गाजर दाखवून या पाणी प्रश्नाचे राजकारण केले आहे. त्यामुळे पाणी येईल हा विश्वास या भागातील जनतेला राहिला नाही.
या सर्व कारणांमुळे आ. आवताडे यांचे सोबत चर्चा करताना नंदेश्वर येथील नागरिक अगदी नैराश्य भावनेने बोलत असल्याचे यावेळी दिसले. पण आ.समाधान आवताडे हे मंगळवेढा तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळे या प्रश्नाला न्याय देतील असेही काही जणांच्या बोलण्यातून दिसले.
पाणी येणारच…
आजपर्यंत मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कोणत्या प्रतिनिधींनी कसे, कोणाला, किती वेळा फसवले यावर मला कसलेही भाष्य करायचे नाही. तुमची आजपर्यंत वारंवार फसवणूक झाली आहे. त्यामुळे तुमची भावना माझ्या लक्षात येतेय.
पण मी फसवणारा माणूस नाही तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा पण दिलेला शब्द मी पाळणार आहे आणि या भागात पाणी आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांचे आणि माझे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही अनुकूल आहेत त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेने निश्चिंत राहावे आपल्या भागात पाणी येणारच आहे.- आ. समाधान आवताडे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज