मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा आरक्षणासाठी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवाली सराटी सोडायची व २९ ऑगस्टला मुंबई गाठणार, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीत दिला.
मुंबईत मराठा आंदोलकाला धक्का लागला तर गावागावांमधील पाणंद रस्तेही मराठा बंद करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाचे नेते आंतरवालीतून १२ लाख गाड्या, ३ कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचेही जरांगे यांनी याप्रसंगी सांगितले.
जरांगे यांनी सांगितले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.
शहागड, आळेफाटा, शिवनेरी, वाशी, चेंबूर, मंत्रालय आझाद मैदान येथे पोहोचून आंदोलन सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या राज्यव्यापी बैठकीस राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा बांधव प एकवटले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज