टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आज बुधवारी सकाळी 11 वाजता सर्वांना जिथे असाल तिथे थांबावेच लागेल. 1 मिनिटांसाठी आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायन आज होणार आहे.
मंगळवेढा नगरपरिषद, सर्व गावात, विविध संस्था, शाळा यांनी नियोजन केले आहे. आज सकाळी 11 वाजता आठवडा बाजारात, शाळांमध्ये,
सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत गायन होणार आहे. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
राज्य सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यसरकारतर्फे करण्यात आलं आहे.
राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे.
तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
केंद्राचं हर घर तिरंगा अभियान
स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आलं होतं. त्याला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज