टीम मंगळवेढा टाईम्स ।
बोकड चोरी प्रकरणातील त्या चौघा आरोपींच्या पोलिस कोठडीत पुन्हा नव्याने दोन दिवसाची वाढ न्यायालयाने केली असून पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडून एक बोकड, तीन शेळ्या असा २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी नाना जगताप, शुभम सावंत, संग्राम जाधव, मोहन गांडुळे (सर्व रा.मंगळवेढा) यांनी घरनिकी येथील शेतकरी श्रीकांत हजारे यांचे दहा हजार रूपये किंमतीचे बोकड दि . ८ नोव्हेंबर रोजी चोरून नेले होते.
पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता प्रथमतः दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
यात तपासिक अंमलदार पोलिस नाईक कृष्णा जाधव व त्यांचे सहकारी पोलिस नाईक श्रीमंत पवार यांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता १८ हजार रूपये किंमतीच्या तीन शेळ्या हाजापूर येथील
चोरल्याच्या व दहा हजार रूपये किंमतीचे एक बोकड घरनिकी येथून चोरल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी एकूण २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिकक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत आहे.
कचरेवाडी येथील दत्तात्रय रोंगे यांच्या तीन शेळ्या चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज एक महिन्यापुर्वी दिला आहे.
दरम्यान,मरवडे रोडवरील माने पेट्रोल पंपासमोरील एका शेतातून मोठ्या प्रमाणात म्हशी वाहनात भरून नेल्या आहेत, याचाही तपास अद्याप लागला नसून
ते शेतकरी सातत्याने पोलिस स्टेशनचे उंबरठे झिझवत असून त्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल या शेळी चोरी प्रकरणावरून ते शेतकरी करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज