टीम मंगळवेढा टाइम्स ।
शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाचायचा नाही तर डोक्यात घालायचा विषय आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवचरित्र या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
व्याख्यानाचे उदघाटन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे,बाबुभाई मकानदार,हिरालाल बागवान, जयदीप रत्नपारखी,प्रभाकर घुले,अजीम शेख,विष्णुपंत जगताप,पांडुरंग नकाते,संतोष बुरकुल,युवराज लुगडे,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड ज्ञानेश्वर कौंडुभैरी आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
१८ नोव्हेंबर १६६५ रोजी मंगळवेढ्याच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम होता ही एक खरोखरच अभिमानास्पद घटना आहे.
रयतेचा लोक कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जगाला संपूर्ण ओळख आहे जो पेरतो तोच या मातीत कर्ता होतो उर्मी,ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक नरदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केले.
वतनदारी मोडीत काढून वेतनदारी देणारा जगातील पहिला राजा म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख आहे ज्याला शेतात नांगर धरता येतो त्याला हातात तलवार धरण्याचे सामर्थ्य छत्रपतींनी निर्माण केले ११० किल्ले बांधून स्वराज्याचे रक्षण करणे त्याचबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शिवछत्रपतींनी रयतेची काळजी घेतली.
अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी छत्रपतींनी फार मोठे कार्य केले आयात निर्यातीचे धोरण महाराजाकडून शिकले पाहिजे सुरतला जाऊन छापा टाकून छपाईचे यंत्र ताब्यात घेऊन देशातील श्री शिवाजी छापखाना म्हणून सुरू केला व तो आज देखील सुरत मध्ये मानाने उभा आहे प्रत्येक तरुणांनी मला ते होणार नाही, जमणार नाही अशी नकारार्थी वृत्ती न बाळगता आयुष्यात काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी केली.
तर यश निश्चितपणे मिळेल असा विचार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज अफजलखान भेटीचा असणारा प्रसंग उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व पराक्रमाची आठवण करून दिली.
एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी व रसिक श्रोते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले तर आभार भारत मुढे यांनी मानले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज