टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या व पाठखळ येथील युटोपियन शुगर्सच्या वजन काट्याची सांगोला वैधमापन विभागाने अचानक तपासणी केली असता तपासणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आल्या नसल्याचे या पथकाने जाहीर केले.
काटा तपासणी पथकाने अचानक भेट देत वजन काट्याची सोलापूरचे वैधमापन शास्त्र निरीक्षक अ.ध. गेटमे , सांगोला वैधमापण शास्त्र निरीक्षक पी. एच. मगर यांच्या उपस्थित तपासणी केली.
तपासणीमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याचे वजन काटा योग्य असल्याचे प्रमाणपत्र भैरवनाथ कारखान्यास वैधमापन पथकाने दिले आहे.
या तापासणीमध्ये कोणताही गैरप्रकार अथवा त्रुटी आढळून आली नाही. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे , जनरल मॅनेजर अनिल पोरे , वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे , केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील तसेच कारखान्याचे पदाधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
‘युटोपियन’च्या वजनकाट्याची वैधमापन विभागाकडून तपासणी
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची तपासणी वैधमापन पथकाकडून अचानकपणे केली जात आहे.
बुधवारी मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स च्या ६० टनी वजन काट्यांची तपासणी वैधमापन विभागाकडून अचानकपणे करण्यात आली. युटोपियन शुगर्सचा वजन काटा हा तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला आहे.
या पथकामध्ये निरीक्षक, वैधमापन शास्त्र सोलापूर व निरीक्षक, वैधमापन शास्त्र सांगोला शाखेचे पी.एच. मगर , उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र सोलापूर अ.ध. गेटमे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी भविष्यात वेगवेगळे प्रयोग राबविणार असून आज वैधमापन विभागाकडून अचानक झालेल्या तपासणीमध्ये कोणताही दोष आढळून आला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी सांगितले.
श्री संत दामाजी साखर कारखान्याचा वजनकाटा प्रमाणित असलेबाबत पुन्हा एकदा सिद्द
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम सध्या सुरु असून दि।०९/०२/२०२२ रोजी सोलापूरचे श्री। अ। ध। गेटमे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र,सोलापूर जिल्हा व श्री।पी। एच। मगर, निरीक्षक,
वैधमापनशास्त्र सोलापूर-४ विभाग तसेच मा।श्री। किशोर रा।धायफुले साहेब,
लेखापरीक्षक श्रेणी १ सहकारी संस्था (साखर) सोलापूरचे यांचे भरारी पथकाने
सायंकाळी ६।०० वाजता अचानक कारखाना कार्यस्थळावर येवून कारखान्याच्या
ऊसवजन काटयाची पाहणी करुन कारखान्याचा ऊस वजन काटा तंतोतंत बरोबर
असलेबाबत लेखी प्रमाणपत्र कारखान्यास दिले
सदरवेळी श्री।विनायक भिवा
कोकरे, रा।ब्रम्हपूरी, व श्री।गुंडु दगडू घोडके, रा। बठाण
या शेतकऱ्या समक्ष ऊसाने भरुन आलेली वजन करुन गव्हाणीजवळ गेलेली वाहने परत बोलावून घेऊन वजन करुन त्याचे वजन बरोबर असलेची खात्री करुन घेणेत आली.
कारखान्याचे चेअरमन मा।आमदार श्री समाधानदादा आवताडे व संचालक मंडळाचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याने दि।०९/०२/२०२२ अखेर ८८ दिवसात २७५४९५ मे।टन ऊसाचे गळीत करुन सरासरी १०%
उताराने २७४९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज