मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही. तसेच मागील थकबाकीमुळे ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही.अशा शेतकऱ्यांना देखील कर्जपुरवठा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने कमी वेळेत आणि कमी त्रासात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे.शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच, येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी त्याला सहजरित्या कर्जपुरवठाही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीनेही सरकार पावले उचलत आहे. ज्या शेतकऱ्याना थकबाकीमुळे पीककर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या अशा शेतकऱ्यांनाही आता कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सहकार आयुक्तांनी सांगितले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढील टप्प्याला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, शहर उपनिबंधक नागनाथ कंजिरे उपस्थित होते. प्रशासक कालावधीत सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचेही सहकार आयुक्त कवडे यांनी कौतुक केले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज