टीम मंगळवेढा टाईम्स ।
आगामी हंगाम काही दिवसांवर आला असल्याने साखर कारखान्यांकडून गाळपाची तयारी सुरू आहे. मात्र मागील हंगामाची दुसरा हप्ता मंगळवेढा तालुक्यातील कारखान्यांनी दिलेला नाही.
येत्या एक-दोन दिवसात दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी असे भावनिक आवाहन घरनिकी गावचे उपसरपंच ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड व लखन मोरे यांनी केले आहे.
सध्या साखरेस मिळणारे चांगले दर, इथेनॉल मोलॅसिस, बगॅस, मळी, स्पिरीट मोठ्या प्रमाणात उपपदार्थांची निर्मिती केली जात आहे. या फायद्यातील योग्य वाटा शेतकऱ्यांना दिला जात नाही.
कारखान्याने याचा विचार करून योग्य मोबदला शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रति टन 200 ते 300 रुपये देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील पिकांच्या अवस्था फारशा चांगल्या नाहत, मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात आता दीपावली सण आला असून शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर ऊसाच्या दुसऱ्या बिलांची प्रतीक्षा आहे.
पांडुरंग व विठ्ठल कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी दुसरी बिले जाहीर केलेली नाहीत. साखरेचे चांगले दर तसेच इतर उत्पादने यामुळे शेतकऱ्याकडून २०० ते ३०० रुपयांपर्यंत दुसरा हप्ताची मागणी करण्यात आली आहे.
…अन्यथा शेतकरी काळी दिवाळी साजरी करतील
मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीपावली सणानिमित्त दुसरा हप्ता 200 ते 300 रुपयांत पर्यंत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी.. कारखान्यांनी हप्ता नाही दिल्यास शेतकरी काळी दिवाळी साजरी करतील.- लखन मोरे, ऊस उत्पादक शेतकरी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज