मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसच्या (coronavirus)वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी घरीच राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी दिल्लीत 50 टक्के बस धावणार आहे. दिल्लीकरांनी घरीच रहावे, बाहेर जाऊ नये. तसेच 72 लाख लोकांना 7.5 किलो धान्य मिळेल, अशी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीत रेशनचा कोटा वाढविला आहे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 72 लाख लोकांना दरमहा 7.5 किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. रात्रीच्या निवारामध्ये मोफत भोजन दिले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेशन दुकानांवर गर्दी करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज