मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात आज कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर गेली असून, आतापर्यंत ३ बळी गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासह सर्वच अत्यावश्यक सेवा जोराने काम करत असून डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांचे काम वाखाणण्याजोगे आहे.
महाराष्ट्रात ८९ कोरोनाबाधित सापडले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना २४ तास निरिक्षणात ठेवले गेले आहे. तर राज्यात आतापर्यंत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून तिन्ही मृत्यू हे मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयातच झाले. राज्यभरात सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात असून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
मुंबईत नुकताच आणखी एकाचा मृत्यू झाला असून तो ५९ वर्षांचा होता. नुकतीच ही व्यक्ती फिलिपिन्सवरून आली होती व खासगी रूग्णालयात उपचार घेत होती. मुंबईतच तिसरा बळी गेल्याने शहरात भितीचे वातावरण आहे.
Advt
The total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 89: Maharashtra Health Department pic.twitter.com/XeETk5sTXf
— ANI (@ANI) March 23, 2020
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज