मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी ‘भारत लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील जनगणना केंद्रसरकारने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.
एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या २०२१ च्या जनणगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने ही माहिती दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज