टीम मंगळवेढा टाईम्स । मांजर कोणी घेवून गेले का असे विचारल्याच्या कारणावरून मनात राग धरून सिताराम किसन रणदिवे याच्यासह त्यांच्या पत्नीचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी बंडू पाटील , आकाश पाटील , सागर मोरे , पोपट अनपट , रवी पाटील , प्रतिक पाटील ( रा.सर्व मारापूर ) आदी सहा जणाविरूध्द अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी सितराम रणदिवे हे दि.२ जुलै रोजी रात्रौ १०.३० च्या दरम्यान शेजारच्या वस्तीवर राहणारे पोपट अनपट व सागर मोरे यांना मांजर कोणी घेवून गेले का हे विचारण्याकरीता गेले असता याचा राग मनात धरून फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा रविराज यांना वरील आरोपींनी तू आमचेसमोर छाती काढून का चालतो असे म्हणून फिर्यादीच्या कानशिलात वरील आरोपीने मारले.
फिर्यादीचा मुलगा रविराज भांडणे सोडवण्यासाठी आला असताना त्यालाही मारहाण केली. व फिर्यादीची पत्नी प्रभावती ही भांडणे सोडविण्यासाठी आली असता आरोपीने तीची साडी ओढून तीला लज्जा वाटेल असे कृत्य करून मारहाण करीत तुम्ही आमच्या पाण्याच्या हौदावर यायचे नाही , तुम्हाला गावामध्ये ठेवणार नाही , तुमची घरे जेसीबीने नांगरून टाकू अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
A case has been registered against 6 persons for molesting a woman by using racist language, mangalwedha police station
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज