मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करून २४ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने रिक्षा वाहतूक , उपहारगृहे , मॉल , सिनेमागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . २२ मार्चपासून आजपर्यंत रिक्षा चालकांवर १९ गुन्हे दाखल करून १२३ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
रविवारी , शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली . संत तुकाराम चौक येथे नाकाबंदीमध्ये २२ रिक्षा आढळून आल्या. त्याचप्रमाणे एमआयडीसी भागामध्ये २ रिक्षा वाहतूक करताना सापडल्या. त्यामुळे २४ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहे . याप्रकरणी सदरबझार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा बाहेर काढू नयेत , बंद कालावधीत रिक्षा फिरताना आढळून आल्यास चालकांवर गुन्हे दाखल करून त्या जप्त करण्यात येतील, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी सांगितले . पोलिसांच्या या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज