मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असून कोरोनाला टक्कर देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे मोदींनी आभार मानले. तसेच, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सूचवले आहे. रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला. देशाप्रती सर्वांची कृतज्ञता पाहून कौतुक करत, आभारही मानले. तर, देशावरील हे संकट सर्वांनी एकत्र येऊन हाताळायचे असल्याचं मोदींनी म्हटलं. यावेळी, गरिब आणि मजदूर वर्गांच्या आर्थिक हितासाठी आवाहनही केलंय.
देशातील व्यवसायिक, व्यापारी, लहान-मोठे दुकानदार आणि लहानसहान संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. माणूसकीच्या नात्यातून या गंभीर परिस्थिताचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे, कोरोनाच्या लढाईत देशासाठी आपलं योगदान द्यावे, असेही मोदींनी म्हटले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज