मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जमिनीच्या वादातून माजी तालुका पंचायत सदस्य शिवानंद अंदानशेट्टी, त्यांची पत्नी आणि मुलगा अशा तिघांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. तिघेही साखरझोपेत असताना धारदार शस्त्राने गळे चिरून खून करण्यात आले. पैकी शिवानंद यांच्या मुलाचा विवाह दहा दिवसांत होणार होता. त्याआधीच दोडवाड (ता. बैलहोंगल) गावात भाऊबंदकीतून हे हत्याकांड घडले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विवाह सोहळ्याच्या तयारीत असणार्या घरांत तीन मृतदेह पडल्याने नातलगांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.बैलहोंगलचे माजी ता.पं. सदस्य शिवानंद (वय 55), त्यांची पत्नी शांतव्वा (वय 46) आणि मुलगा विनोद (वय 26) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शनिवारी मध्यरात्रीनंतर 2 ते पहाटे 4 वा. यावेळेत हे हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती कळताच दोडवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, कित्तूर एसीपी आदी अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.भाऊबंदकीतील जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भाऊबंदकीतील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज