मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात कोरोनाच्या महामारीने अक्षरशः हाहाकार माजविला असून या गंभीर प्राणघातक आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेली अति सक्रिय पावले कौतुकास्पद आहेत , अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी समाधान व्यक्त केले आहे.सद्य : स्थितीत टीकाकारसुद्धा केंद्राच्या प्रयत्नांची प्रशंसा करीत . असल्याचे न्यायालयाने म्हटले टीकाकारांकडूनही आहे.
सरकारची प्रशंसा कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे , न्या . एल . नागेश्वर राव आणि न्या . सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.
खंडपीठाने म्हटले की , देशावर सध्या कोरोनाचे महासंकट ओढावले आहे . त्यामुळे उद्भवलेल्या स्थितीशी दोन हात करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत . हे राजकारण नव्हे तर हीच वस्तुस्थिती आहे . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सक्रिय भूमिका बजावत आहे . केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न कौतुकास्पद आहेत . सरकारच्या भूमिकेचे टीकाकारसुद्धा स्वागत करीत आहेत , असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.
सार्वजनिक स्थळी थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था करणे , कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा वाढविणे , संशयितांचे विलगीकरण करणे , रुग्णालयांमध्ये खाटांची अतिरिक्त सोय करणे आदी प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याची मागणी प्रस्तुत याचिकांमधून करण्यात आली होती . पत्रकार प्रशांत टंडन आणि सामाजिक कार्यकर्ते कुंजन सिंह यांनी वरील याचिका दाखल केल्या आहेत . सर्व याचिकाकर्त्यांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर करावे , असा सल्लासुद्धा न्यायालयाने दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज