मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रत्येक वेळी शेतकरीच का दबला जातोय याचं कारण समजायला तयार नाही
प्रत्येक दिवस शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या मार्गातून अडचणी निर्माण होतात अतिवृष्टी असेल, पुर परिस्थिती, हवामानात बदल असेल रोगराई असेल अशा अनेक कारणामुळे प्रत्येक ठिकाणी माझा शेतकरी दबला जातोय.
आज पुन्हा एकदा माझा शेतकरी हतबल होत असताना दिसत आहे. आज कोरोनामुळे देशावरती मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल यांनी संचारबंदी लागू केली आहे यामुळे सर्व नोकरदार असतील खाजगी कंपनीतील कामगार असतील अशा सर्व कर्मचारर्याना शासनाने घरात बसून राहण्याचा आदेश दिला आहे
असे असताना देखील ग्रामीण भागातील माझा शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करत असताना आपल्या ला दिसतोय*
परंतु तो करत असलेल्या कष्टाचं याठिकाणी निष्फळ होत असताना दिसत आहे
एका ठिकाणी जे नोकरदार असतील उदाहरणार्थ प्राध्यापक वर्ग यांना महिना काठी नव्वद हजार रुपये पगार असतो म्हणजे दिवसाकाठी तीन हजार रुपये पगार त्यांना घरी बसून मिळत आहे, असे अनेक नोकरदारांना मिळतो आहे परंतु माझा शेतकरी त्याठिकाणी दिवसभर काबाडकष्ट करत आहे परंतु त्याच्याकडे कामाचे मोल त्याला मिळत नसल्याचे दिसत आहे.
मित्रांनो ग्रामीण भागातील शेती करत असताना शेती बरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यासाठी त्याला दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात आणि कष्ट करून जर त्यांच्या घामाचे दाम मिळत नसेल तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही मित्रांनो आता कुठेतरी या व्यवसायाला चांगले दिवस आले होते त्यामुळे शेतकरी खुश होता परंतु कोरोनामुळे दुग्धव्यवसाय, अडचणीत आल्याचे दिसून आले आहे . अगोदर शेतकऱ्यांना दुधाचा दर 33 रुपये ते 34 रुपये 50 पैसे एवढा मिळत होता परंतु आता वीस रुपये दराने दूध घेतले जात आहे
कोरोणामुळे संचार बंदी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याला भले पहाटे चार वाजता उठून धारा काढून सकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत दूध डेरी मध्ये घालावे लागत आहे एवढे करूनही त्याला त्याच्या घामाचे दाम मिळत नसेल तर काही उपयोग नाही .
हा शेतकरी पुन्हा एकदा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे म्हणून माझं राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष घालावे या विषयाकडे गांभीर्याने पहावे.अन्यथा लॉकडाऊन संपताच सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासगी आणि सहकारी दूध संघावर प्रहार करून शेतकऱ्यांना उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज