मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कारखाने सुरू होऊन हंगाम संपत आला तरी अजूनही तालुक्यातील काही कारखानदाराकडून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बिला पैकी व तसेच चालू गाळप हंगामातील ऊसाची बील अदा केली नाहीत. तसेच अनुदान येऊन सुध्दा मागील राहिलेली बिल अदा करण्यास कारखानदार टाळाटाळ करीत आहेत प्रहार शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्याच्या शिवाय राहणार नाही असा इशारा राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील कारखाने चालू होऊन सध्या उसाचे गाळप हंगाम संपत आला असला तरी काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल रक्कम जमा केले नाही खरंतर ऊस कारखाना गाळप केल्यापासून 15 दिवसात आत कारखान्यांनी आपलं पाहिलं बील म्हणजेच एफ आर पी जमा करणं बंधन कारक असताना अध्यापही कारखानदार मूग गिळून गप्प आहेत त्यात यंदा आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा दुहेरी संकटात अडकलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यात वाढलेली मजुरी उत्पादन खर्च या सर्वांना तोंड देण्यासाठी त्याच्याकडे अध्याप पैसा नसल्याने त्याची पुढील मशागत सध्या थांबलेली आहे .
तसेच गत हंगामातील राहिलेली बिल अध्याप कारखानदारांनी दिली नाहीत
अनुदान आल्यावर देतो म्हणून आजपर्यंत वेळ काडून नेली पण आज कित्येक कारखण्यानि अनुदान येऊन सुध्दा बिल दिली नाहीत ती सुद्धा येत्या आठ दिवसात न दिल्यास जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज